महेशने म्हटल्याप्रमाणे वातावरण निर्मिती, वाचकाला प्रत्यक्ष अनुभूती देण्याकरिता ग्रामीण भाषा वापरली तर चांगलाच परिणाम होतो.
भाषाशुद्धीचा आग्रह धरणारे पुलही त्यांच्या लेखनात असा स्पेशल इफ़ेक्ट घालतात. पण म्हणून सर्व ठिकाणी तशीच भाषा वापरत नाहीत. जसा उच्चार तसेच लेखन असा अतिरेकी आग्रह धरणार्या विचाराला उत्तर म्हणून त्यांनी खिल्ली (चूभूद्याघ्या) नावाच्या पुस्तकात एक गोष्ट लिहिली आहे. तिच्यात अशा आग्रहातून काय हास्यास्पद घटना घडतात ते वर्णिले आहे. तिथेही हाच विचार व्यक्त होतो.
आता म्हण ही मूळात बोलीभाषेत होती का नाही हे कसे ठरवणार? बहुतेक म्हणींचा कर्ता अज्ञात असतो. तेव्हा मूळ म्हणीत अडला नारायन होते का अडला नारायण होते हे नक्की माहित नाही. तेव्हा ती शुद्ध भाषेतच व्यक्त केलेली बरी.
काव्यात व्याकरणाचे नियम शिथिल असतात हे सर्वज्ञात आहे तेव्हा माझे मत त्या वाङमय प्रकाराकरिता नव्हते.
(वाङमय हा शब्द शुद्ध कसा लिहायचा हो?)