गांगलजींनी त्यांचा फॉन्ट कि-बोर्ड वरील ९४ चाव्यामध्ये बसविला आहे, पण इथे परत एका गोष्टीवर त्यांनी विचार करावा तो म्हणजे खरचं मराठीतील सर्व अक्षरे (इंग्रजीसाठी बनविलेल्या) कि-बोर्ड राहू शकतात का?
'शिवाजी' हा फॉन्ट जेव्हा बनविला तेव्हा देखिल तो कि-बोर्ड वरील ९४ चाव्यामध्ये बसविला गेला, मग तीच चूक (मराठीतील सर्व अक्षरे देण्यासाठी) सुधारण्यासाठी मराठी टायपिंगसाठी अनेक सॉफ्टवेअर्स बनले आणि त्यांनी देखिल स्वतःचा कि-पॅड तयार केला, त्यात अजून भर ती म्हणजे त्याच्या सॉफ्टवेअरद्वारे केलेले काम दुसरीकडे नेण्यासाठी त्यांच्या फॉन्ट अथवा सॉफ्टवेअरची आवश्याकता असते.
सॉफ्टवेअरचा त्रास वाचविण्यासाठी आणि मराठीतील सर्व अक्षरे देण्यासाठी किरण भावे याने 'किरण' फॉन्ट तयार केला, त्यासाठी त्याने कि-बोर्ड वरील 'Alt' ह्या बटणाची मदत घेतली आणि एक चांगला फॉन्ट तयार केला, ज्याद्वारे अनेक वेबसाईट बनल्या, पण इथे देखिल 'किरण' फॉन्ट द्वारे वेबसाईट बनविताना डायनॅमिक फॉन्टची गरज भासते.
मला असे वाटते की या मराठीतील सर्व अक्षरे आणि डायनॅमिक फॉन्ट ही समस्या सोडविण्यासाठी युनिकोड हा सर्वात चांगला पर्याय आहे.
युनिकोड मध्ये १) मराठीतील सर्व अक्षरे मिळतात, २) डायनॅमिक फॉन्ट गरज नाही ३) तसेच युनिकोड कि-पॅडद्वारे ५ मिनिटमध्ये कोणीही चांगले मराठी टाईप करु शकतो. ४) फॉन्ट दुसरीकडे नेण्याचा त्रास नाही. ५) (सर्वात महत्त्वाचे) गुगल सर्च मध्ये दिसतो. ६) दिसायला छान.
गांगलजींनी बनविलेला फॉन्ट म्हणजे युनिकोड च्या आधीची पायरी, म्हणजेच वर चढत (प्रगती करताना) असताना चार पायऱ्या खाली का उतरायचे.
गांगलजींनी बनविलेला फॉन्ट जर वर सांगितलेल्या ६ फायद्याची पुर्तता करीत असेल तर तो वापरायला हरकत नाही.
यावार गांगलजीं काय म्हणतात... बघूया?
झाले माझे बोलून,
धन्यवाद.