मन कधी तृप्त... अन कधी आसुसलेले
मन कधी शांत... अन कधी गहिवरलेले
मन भिरभिर होते... अन मागते काही
कधी होते कैकयी... कधी भिष्माची ग्वाही !

ह्या कातरवेळी... साजण घाली साद
त्या कळे कसे ना... देऊ कसा प्रतिसाद
तो दूर तिथे... परी मन रेंगाळून 'येथे'
मम श्वास... ध्यास... विश्वास मागुनी घेते !

छान....हे दोन्ही तुकडे खूप आवडले.

त्यातही

मन भिरभिर होते... अन मागते काही
कधी होते कैकयी... कधी भिष्माची ग्वाही !
....................
ह्या कातरवेळी... साजण घाली साद
त्या कळे कसे ना... देऊ कसा प्रतिसाद

या ओळी तर खासच...शुभेच्छा.