माझा स्वतःचा अनुभव असा आहे, १०० किंवा आपल्या जवळचे पोलिस स्टेशन यापैकी किंवा दोन्हीकडे फोन करुन तक्रार केल्यास कारवाई होते! थोडेसे पाठी लागावे लागेल, कदाचित तुमच्या बाजुने आजुन चार लोक असल्यास आणखिन बरे होईल पण काम फत्ते होईल! हे सर्व करताना पोलिसांबरोबर थोडिशी हुज्जत घालावी लागेल, पण आपण सोडायचे नाही. १०० ला तक्रार करुन लोकल पोलिस स्टेशन काही कारवाई करत नसल्याचे कळवल्यास व्यवस्थीत परिणाम होतो!

या बाबत आपल्या विभागाच्या नगरसेवकाकडे लेखी तक्रार करुन त्याची एक प्रत पोलिस स्टेशनला देणे, आपण ही सर्व गणेशोत्सव मंडळे व नवरात्रोत्सव मंडळे वर्गणी मागायला आल्यावर नम्र शब्दांत "आम्ही तिथे जरुर येवु, पैसे पेटीत टाकु, पण आम्हाला आवाज, रस्ता अडवुन मंडप घालणे, दांडिया करणे वगैरे हा त्रास झाला नाही तरच!" असे सगळ्यानी सांगायचे! आपल्या आजुबाजुच्या वस्तीत चांगल्या सोसायट्यातुन जनजाग्रुती करायची आणि आपल्यासारखे अल्पसंख्यांक आहेत ते बहुसंख्य होतील असे प्रयत्न करायचे. पैसे द्यायचे नाहीत असे ठरवायला जा, बरेच लोक तुमच्या बाजुने लगेच तयार होतील!

या मंडळ वाल्यांची पैशांची नाडी आवळल्यास बरेच काही साध्य होईल!