चित्त यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. अगदी भारतातील सर्व भाषेतील सासू-सून-नणंद छाप मालिका व चित्रपट बंद करायलाच हवेत. त्यात नणंद पण सहभागी असते. घराघरात आग लावण्यात या मालिका हातभार लावतात. एकमेकांवर कुरघोडी व डाव-प्रतिडाव कसा टाकावा हे या मालिका शिकवतात. आधीच असलेला सासू-सुन-नणंद यांचा एकमेकांबद्दलचा आकस / पूर्वग्रह वाढवण्यात या मालिका हातभार लावतात. एकता कपूरच्या मालिकांबाबत तर सांगायलाच नको. त्या तर विवाहबाह्य संबंध कसे टिकवावेत (एकमेकांपासून लपवून) हे उदाहरणासह दाखवून देतात. फक्त भारत हाच एकमेव देश असा आहे त्यात सासू-सुन-नणंद यांच्या भांडणांमूळे सत्तर टक्के पुरूष कावलेले असतात. ते बिचारे हतबल होतात. मराठी चित्रपटांबाबत तर सांगायलाच नको. थांब लक्ष्मी कुंकू लावते, माझे घर माझा संसार, लेक चालली सासरला, असे अनेक चित्रपट काढून सगळ्या पुरूष मंडळींचे जीणे नकोसे करतात. ज्या घरात सासू सुनेचे सतत वाजत असेल, तेथे पती-पत्नी मधले शारिरीक संबंध तरी निकोप असू शकतील काय? म्हणूनच की काय, थोर परंपरा लाभलेल्या या देशात एडस च्या रुग्णांचे प्रमाण जास्त का आहे? लग्न झाल्यावरही जर अशा कारणांमूळे सेक्स मधे अडथळे येत असतील तर साहाजीकच पुरूष बाहेर जाणार. मला माहिती आहे, या वाक्यावर टिका जरूर होईल पण मला जे वाटते ते मी सांगितले. अखिल भारतीय सासू-सून-नणंद यांनी हे लक्षात घेवून स्वतःला सुधारले पाहिजे. विशेष म्हणजे कुणाच्या संसारात किती हस्तक्षेप करावा याची सीमारेषा आखली पाहिजे. सगळ्या भांडण तंट्यांचे मूळ स्त्री च असते. स्त्रीच स्त्रीची दुश्मन आहे. पूरूष नाही.