मी गेली कित्त्येक वर्षे एक युक्ती वापरत आहे. उदाहरणार्थ फार पुर्वी 'तारा' नवाची मालिका आली होति, मग मधे अश्याच काही मालिका, नंतर क मालिका.. आता त्यांची भ्रष्ट नक्कल करणार्या मराठी मालिकांचा रतीब ...(गंमत आहे नाही? आप्ल्याकडे अगोदरच भ्रष्ट असलेल्या एखाद्या गोष्टीची परत भ्रष्ट नक्कल करणारे लोक आहेत, ते खपवून घेणारे लोक पण आहेत!!!)
तर, मी काय केले? दर मालिकेच्या वेळी साधारण त्या मालिकेच्या मुळ कथेत पाणी घालायला लागले की जाहिर करून टाकत असे, आता ही मालिका घरात बघायची नाही.. असे सोळा भाग म्हणजे एपिसोड झाले, की सोळा एपिसोड सोडल्याची एक मस्त साडी, बाहेर जेवण असे सेलिब्रेशन करायचे.. मग या बायकाच... आई, बहिण, बायको, मावशी, वगैरे ज्या कुणी असतील त्या... अभिमानाने शेजारी पाजारी मिरवून सांगायला लागल्या - "सध्या आमच्याकडे सोळा एपिसोड चे व्रत चालू आहे.. कहानी घर घर की चे!"... मग सगळ्याना त्या नव्या रोगाची लागण झाली आणि अश्या रितिने मी माझ्या आजुबाजुच्या अनेक पुरुषांची चिंता मिटवली. (आजून एक छुपी आयडिया आहे.. त्या मालिकेतील चांगल्या भुमिकेतील स्त्री पुरुष पात्रांच्या खर्या आयुष्यातील कहृ्या खोट्या भानगडी काढून रसभरीत चर्चा करून त्यांच्याबद्दल वाईट मते तयार करणे, वगैरे...)