भारताचा पंतप्रधान कोण होईल यापेक्षा अलिकडे भारतीय क्रिकेट संघाचे (जिला प्रसारमाध्यमे कौतुकाने टीम इंडिया असे म्हणतात) कर्णधारपद कोणाकडे जाईल याला अधिक महत्त्व आले आहे. क्रिकेट या खेळाशी माझे काही शत्रुत्त्व नाही. पण अलिकडे क्रिकेटचे जरा अतिच होऊ लागलंय असं मला वाटतं.

ढोणीचं म्हणाल तर याने झोकात पदार्पण केलं, अनेक सामने जिंकून दिले. त्याची सरासरी चांगली आहे. आणि मुख्य म्हणजे त्याला ३ वर्षांचा अनुभव असून तो अजून तरूण आहे. सहकाऱ्यांसोबत मिळून मिसळून वागतो. असा सुवर्णमध्य साधून जर त्याची कर्णधारपदी निवड झाली आहे तर त्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. २० - २० विश्वचषक जिंकून त्याने निवड सार्थ ठरवली आहे. ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभव पत्करावा लागला त्या मालिकेत त्याने काही चांगले यष्टीचीत केले. यष्टीरक्षणाचे म्हणाल तर श्रीशांत चेंडू एवढे रूंद टाकतो की तो पकडायला हनुमान उड्याच माराव्या लागतील. ढोणी काय करेल बिच्चारा!

पण खेळापेक्षा खेळबाह्य गोष्टी उदा. केसांची ठेवण, जाहिराती इत्यादी गोष्टींकडे  अधिक लक्ष देत राहिल्यास काही खरे नाही.

द्रवीड ने कर्णधारपद सोडलेले, सचिन पुन्हा जबाबदारी स्वीकारायला तयार नाही आणि गांगुलीचे बीसीसीआय शी वाकडे यामुळे युवराज हा एक विकल्प नक्कीच होता. एरव्ही ढोणीची कर्णधारपदी निवड ही काही अनहोनी आहे असे वाटत नाही.

१९ ऑक्टोबरच्या लोकमानस मध्ये माझे क्रिकेटसंबंधी एक पत्र प्रसिद्ध झाले आहे. ते येथे वाचता येईल.

http://www.loksatta.com/daily/20071019/lokma.htm