मराठीत लिहिताना प्रामुख्याने ऱ्हस्व दीर्घाच्या चुका होतात.  आपण जसे उच्चार करतो तसे लिहिले तर  चूक होण्याची शक्यता कमी.  लिहिलेले पुन्हा ऱ्हस्व दीर्घानुसार वाचले तर अनवधाने झालेल्या जवळजवळ सर्व चुका लक्षात येतात.   मराठी शुद्धलेखनाचे नियम अत्यंत सोपे आहेत, पण शुद्ध उच्चार करणाऱ्या लेखकाला त्यांचे ज्ञान असण्याची  अजिबात गरज पडत नाही.   बाकी उरतात त्या शब्दनिवडीच्या आणि व्याकरणाच्या चुका.  त्यासाठी, वाचन केलेले असेल, व शब्दांची व्युत्पत्ती आणि व्याकरणाचे जुजबी ज्ञान असल्यास बस्स होते.