महाभारत ह्या विषयावरच्या टीकेसाठी इरावती कर्व्यांची युगांत वाचावी.  भांडारकर संस्थेने प्रसिद्ध केलेल्या महाभारताच्या संशोधित आवृत्तीवर ती आधारीत आहे.  मुळ महाभारतात बहुधा नसलेले आणि मागाहून घुसडलेले सगळे संदर्भ, गोष्टी वगेरे ह्या संशोधित आवृत्तीत काढून टाकल्या आहेत. युगांतात त्याचीही मिमांसा केलेली आहे.

युगांत मध्ये ह्या सगळ्या महाभारत कालीन पात्रांची फार चांगली ओळख होते. त्याचबरोबर त्यावेळची सामाजिक स्थिती, वेगवेगळ्या लोकांचे समाजातील स्थान याचीही माहिती मिळते.

आपण कथा कादंबऱ्यातून वाचलेली पात्रांची वर्णने, स्वभाव विशेष आणि प्रत्यक्षात असलेले त्यांचे रुप फार छान मांडले आहे त्यात.  कर्णावरील लेख ही फार छान आहे.  कर्णाची खरी ओळख त्यातून होते. 

ज्याना राधेय, कौंतेय आणि मृत्यूंजय वाचावेसे वाटतात, त्यानी युगांत वाचणे देखिल आवश्यक आहे.  नाण्याच्या दोन्ही बाजू माहित असायला हव्यात.

गूगल वर yuganta iravati karve एवढे लिहून शोधल्यास अजून माहिती मिळेल.