१. इथे खरोखरच अडचण आहे. ते त्या कंपनीच्या कार्यपद्धतीवर आहे.
२. मलाही ह्याचा राग आला होता. परंतु त्याने म्हटले की तुम्हाला सांगितलेल्या वेळेत तुम्हाला पोहोचवू. त्यामुळे आपल्याला खरोखरच ते किती वेळ लावतील हे आधीच माहित पाहिजे. :(
३. ते विकत घेऊ नये. घेणारे नसतील तर विकणारे ही बंद करतील. पण हे नेहमीच लागू होत नाही. बहुतेक (आळशी?) लोक तिथेच विकत घेतात व त्यांना प्रोत्साहन देतात.
४. इथे आपण सांगू शकतो की गाडी वेळेवर काढा.
५. सिनेमा नको पाहिजे तर बंद करू शकता. बहुतेक वेळा सगळे वाट बघत असतात की कोण पुढाकार घेतो, किंवा मस्त झोप काढत असतात. बाकी, मी सर्व चित्रपट पाहतो, त्यामुळे ह्या मुद्द्यात जास्त काही नाही म्हणू शकत. रेडिओ चे ही तेच. सांगून बघा.
६. ह्याबाबत सध्या काही सुचत नाही.
७. आजकाल बहुतेक लोक शनिवार/रविवारी पुणे/मुंबईला राहून सोमवारी सकाळी प्रवास करणे पसंत करतात. त्यामुळे हा भाव वाढला. तेच शुक्रवारी संध्याकाळी ही खूप गर्दी होत असते.
ह्या सगळ्यांवर वाहतूक विभागाकडे तक्रार करू शकतो का?
शेवटी एक आहे... मागणी/पुरवठा तत्त्वावरच हे चालत आहे. लोकांनीच त्यांना रस्त्यावर आणले पाहिजे.