मरापम च्या संकेतस्थळाचा अनुभव घेतला.पण संकेतस्थळ छान बनते आहे.
सुरुवातीला काही विशिष्ट मार्गांवरील तिकीट आरक्षित करण्यासाठी नक्कीच
चांगली मागणी असेल. उदाहरणार्थ: मुंबई-पुणे मार्ग. पण अजून संकेतस्थळावर
आरक्षणाची सोय दिलेली दिसत नाही. पण शेवटी संकेतस्थळ कितीही चांगले झाले तरी मरापमच्या सेवेतही गुणात्मक वाढ व्हायला हवी. ती होईल ही अपेक्षा. तसेच स्पर्धेमुळे सर्वांचेच भले होईल, असेही वाटते.
ही बातमी महाराष्ट्राचे पानावर किंवा मुख्य पानावर न येता पुण्याच्या पानावर येण्याचे कारण काय असावे?
वृत्तपत्रांत काम करणारी मंडळी अधिक चांगले उत्तर देऊ शकतील. पण मला वाटते की बातमीचे महत्त्व ओळखून ती कुठे लावायची/पाठवायची हे उपसंपादकांचे काम आहे. ही बातमी बघणाऱ्या उपसंपादकाला ही बातमी उर्वरित महाराष्ट्रासाठीही महत्त्वाची आहे, असे वाटले नसावे. किंवा घाईघाईत पुण्याची बातमी म्हणून त्याने फारसा विचार न करता पुण्याच्या पानावर बातमी लावली असावी.