हे पटण्यासारखे आहे. धाकदपटशाने / बळाचा वापर करून काही दहशतवादी संपविता येतील परंतु जोवर त्याच्या मूळ कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाय (बहुधा राजकीय) होत नाहीत, तोवर दहशतवाद संपणार नाही.

मुळात इस्रएलचा पॅलेस्टाईन भूमीवरील कब्जा हा पूर्णपणे बेकायदेशीर आणि अन्याय्य आहे. तसेच इस्रएलला निर्मितीपासूनच अमेरिका अनेक कारणांमुळे पूर्ण पाठिंबा देत आला आहे, हे इस्रएलचे  गोडवे गाणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे.  'ठकास महाठक व्हावे' असे म्हणणे सोपे आहे व इस्रएल आणि भारताची तुलना होऊ शकत नाही. पण मुळात जो सिंह नसतो तो डरकाळू शकत नसतो आणि तो डरकाळलाच तर त्याची डरकाळी म्हणजे अखेर एक क्षीण म्याउँ असते हे खरे.

"सर्वात महत्त्वाचे म्हणजे दहशतवादाला पाठिंबा देणा-या देशांवर भारताने वेळप्रसंगी अण्वस्त्रे टाकण्यासही कमी करू नये."
हे मात्र बिलकुल पटले नाही.  तुम्हाला अण्वस्त्रे म्हणजे दिवाळीतले सुतळीबाँब, लक्ष्मीबॉंब, आपटबार वाटले की काय?  हिरोशिमा आणि नागासाकीला जाऊन या जरा.





 

पाकिस्तानाच्या बाबतीत तर हे 'एखाद्याचा मुखभंग करण्यासाठी स्वतःचे नाक कापावे', असे म्हणण्यासारखे होईल. उद्या लाहोरवर अण्वस्त्रे टाकली तर त्याचा अमृतसरवर काय परिणाम होईल ह्याचा विचार करावा.

बाकी अतिरेक्यांपुढे कंदहारसारखे कधीच झुकू नये हे खरेच.


१. इंग्रजीतल्या 'टू कट ऑफ़ वन्स नोज़ टू स्पाइट ऑफ़ वन्स फ़ेस'वरून