माझ्या मते काही फरक पडणार नाही. कारण ते नवीन लोक खरोखरच चांगले असले तर आत्ताच्या राजकीय माफिया टोळ्या त्यांना पुढे येऊच देणार नाहीत. तसेच संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनाही कोणी प्रामाणिक व्यक्ती त्यांच्या डोक्यावर आलेली आवडणार नाही.
आणि जर ते चांगले नसले तर मात्र लगेचच मुख्य प्रवाहात हात धुवून घ्यायला सरसावतील आणि आत्ताच्या व्यवस्थेमध्ये छान मिसळून जातील.
उगाच भाबडेपणाने मोठ्या बदलाची स्वप्ने बघू नका!!!