लीडर निवडण्यासाठी टाइम्स ऑफ इंडिया ने चालवलेली मोहीम हा पुस्तकी प्रकार वाटतो. अंतिम फेरींत आलेल्या उमेदवारांनाही फक्त परवलीचे शब्द व घोषवाक्ये ठाऊक आहेत. सार्वजनिक कार्याची पार्श्वभूमी व सार्वजनिक प्रश्नांची जाण कितपत आहे हे पाहू गेल्यास त्यांची स्थिति गाव / तालुका स्तरावरील प्रस्थापित राजकारण्यांपेक्षाही निराशाजनक आहे. त्यामुळे निवडला गेलेला नेता निवड करणाऱ्यांच्या किंवा निवडून देणारांच्या अपेक्षा कितपत पुऱ्या करू शकेल याची शंकाच आहे. फारतर तो स्तंभलेखन करू शकेल.