सर्व स्पर्धकांची मते चांगली आहेत. सर्वांकडे चांगले मुद्दे आहेत, विचार आहेत. काय चुकतय व त्यावर साधारण ऊपाय काय, हे ही ज्ञात आहे. पण हे सर्व बोलण्यापर्यंत मर्यादित राहू नये. कारण नुस्ता बोलणारे आपल्या देशात घराघरात आहेत. हा एक चांगला ऊपक्रम आहे, पण जो कोणी विजेता/ती होईल त्याने प्रत्यक्ष राजकारणात ऊतरावे व कार्याला प्रारंभ करावा. पण हे कितपत यशस्वी होतील या बद्दल शंका आहे. कारण या देशाचे राजकारण अत्यंत हिडीस व किळसवाणे आहे व चांगल्या व्यक्तींना टिकू देत नाही. यांनी जरी कामाला सुरूवात केली तरी लोकांचा प्रतिसाद हा मर्यादित राहील असे वाटते. आपल्या ईथे अशी मानसिकता आहे की कुणीतरी कामाला सुरूवात करावी व आपण दूर बसून त्याचे कौतुक करावे पण प्रत्यक्ष त्यात भाग घेऊ नये.
या कार्यक्रमातील सर्व स्पर्धकान्ना मनापासून शुभेच्या!!