मस्त लिहिली आहेस कविता..

वेदनेच्या उमटता लहरी कधी तानेतल्या ।
तेजात क्षणभर नाचले उन्मुक्त नभी सौदामिनी.

भाव एकाकार होते, अंतरातिल गूज ही ।
हृदयी तुझ्या जे उमटले, अश्रूत ते ह्या लोचनी ॥

भेटेन मी द्वैतास बेदरकार आता रोजही ।
गायली संपूर्ण मी ही भैरवी द्वैतातुनी. ।

या ओळी खूपच सुंदर....

- प्राजु.