या उच्चारांना मूर्धन्य आणि तालव्य म्हणतात आणि उच्चार करताना काळजी घेतली तरी ऐकणाऱ्याला काही फारसा फरक जाणवत नाही त्यामुळे ते नष्ट झाल्यातच जमा आहेत मात्र संवयीने अजून ते बऱ्याच अंशी बरोबर लिहितो एवढेच ! उदा : ही चर्चा उपस्थित करणारे संतोष यांनी स्वतःचे नाव संतोश असे लिहिले आहे आणि त्यानी तसे लिहिल्यावर ते चूक आहे कसे म्हणावे कारण ते त्यांचेच नाव आहे. संतोश षालिग्राम लिहिले तरी ते बरोबरच म्हणावे लागेल.