राज ठाकरे यांना नेमके काय म्हणायचे हे मराठी वृत्तपत्रातही नीट छापून येत नाहीये.  मराठी लोकांनाच त्याचा अजून पत्ता लागला नाही तर इतरांचे काय? अशा वेळी हिंसाचार केलेला मात्र ठळकपणे छापून येतो. 

ठाकऱ्यांना खरेच काही चांगले सुचवायचे असेल तर त्यांनी  सध्यापेक्षा चांगला (म्हणजे हिंसाचार रहीत मार्ग)नको का शोधायला?  त्यांच्याकडून खुप अपेक्षा आहेत.  पण हा हिंसाचार पाहिला की ते कुठे चालले आहेत ते समजत नाही.

बाकी ह्या प्रतिक्रियावाल्यांना काय.  परप्रांतियांच्या मते त्यांच्या मुळे महाराष्ट्राची प्रगती झाली, पण मुळात त्यांना त्यांचा प्रांत का सोडावा लागला? त्यांच्या प्रांताला एवढ्या प्रगतीची ~अलर्जी होती की काय की त्याना खास महाराष्ट्रात येउन स्वतःचे गुणदर्शन मांडावे लागले?  लालु/ मायावती वगेरे मंडळी हा असला विचार करतील याची सुतराम शक्यता नाही.