अमितराव
टाकं हा विशेषतः ट्रेकर्समध्ये लोकप्रिय शब्द आहे.
`लोकं' पण असाच भयानक शब्द...कबूल!
तो विशेषतः मुंबईतील मराठी- हिंदी चा प्रभाव आहे.
`ते लोक निघालेत' असं म्हटलं जातं सहजपणे.
`ते सगळे निघालेत' म्हणणं अपेक्षित असतं.
असो.
दोष काढण्याचा हेतू नाही. सहज गम्मत.
आता, खानदेश-विदर्भात नाही का,
`चालला गेला' वगैरे म्हणतात.
`परेशान', `भिन' असेच काही शब्द. त्या त्या भागाची खासियत, किंवा प्रभाव.
तिकडे `मागे' किंवा `आत' या अर्थी `मधे' शब्द वापरतात. `तो मधे गेलाय' म्हणजे, आत गेलाय, असं समजायचं.