माझ्या एका मित्राचा अनुभव सांगतो. त्याची बदली बिहारमध्ये बँकेतर्फे झाली होती. त्याचे दोन्हीवेळचे जेवण, सर्व घरकाम, वगैरे ,एक बिहारी नोकर ,फक्त दोन रुपयांत करत होता.(१९८०-८५). महिन्याचे सर्व पैसे आगाऊ देऊ केल्यास (३० रु.), वाटेत लुटतील या भीतिने नाकारत होता. 'दरोगा' या नुसत्या शब्दानेही तो चळचळा कापायचा. यावरून तिथल्या परिस्थितीची कल्पना येते.