एक ललित लेख म्हणून या लेखनाचा विचार का नाही करत?
प्रत्येक गोष्ट मनाला लावूनच कशाला घ्यायला पाहिजे?
`तुम्ही आत्ता कुठे आहे' हे मी पुण्यातच, वर्षानुवर्ष पुण्यात राहणाऱ्या पुणेकराकडूनच ऐकले आहे.
तेही कोथरूड, सदाशिव पेठेत राहणाऱ्याकडूनही. (दत्तवाडी, पानमळ्यातच भागातील झोपडपट्टीत नव्हे. मी पानमळ्यातच राहत असलो, तरी!)
'हा ना एड्या' ही ग्रामीण ढंगात बोलायची पद्धत आहे. `लै भारी' असं शुद्ध पुणेकर म्हणवणारी पुणेकर तरुणाईही म्हणते. (मुलीसुद्धा!) भाषेतल्या गमतीजमती सांगणं एवढाच या लिखाणाचा उद्देश आहे. शब्द पुल्लिंगी की स्त्रीलिंगी, यावर वाद किंवा बदलही असू शकतो.
`फुटाणे' हा तसाच प्रांतिक प्रभावाचा विषय. मान्य.
पण केळी (अनेकवचन) ऐवजी `केळं', लेणी (अनेकवचन) ऐवजी `लेण्या' हे कसं मान्य करावं?
``आणि चणेफुटाणे म्हणजे काय मग तुमच्या भाषेत? चणेचणे की काय?''
`आमची भाषा' वगैरे काही अस्तित्त्वात नाही.
पण आम्ही चणे-शेंगदाणे म्हणतो. (मोठ्या टपोऱ्या चण्यांना आम्ही `काबुली चणे' म्हणतो.) जनरली, आपण दुकानातून चणे आणि भाजके शेंगदाणे विकत घेतो.
असो.
केसं, दगडं, बैलं हे मात्र भीषण आणि ते मी पुण्यात फार क्वचित ऐकलंय. सांगलीमध्ये जास्त ऐकलंय. मुंबईतही..
चावी हा शब्द तर खास मुंबईकरांचाच. पुण्यात मी मुळीच ऐकला नाहीये.
पेन्सिल्या, गटारी आणि कारंजा.. ना रे बाबा हे पण कधी ऐकलं नाही.
आपण पुण्याच्या `रस्त्यावर' उतरलेल्या दिसत नाही. `केसं', `चावी' सर्रास ऐकलं जातं. अर्थातच, पक्का पुणेकर हे म्हणणार नाही. पण म्हणजे, पुण्यातच तो शब्द नाही, असं नाही.
पेन्सिल्या .. हेही क्वचित.
मुंबईची मराठी भीषण आहे, नक्कीच. पण बहुधा, ती मुख्यतः हिंदी भाषकांच्या (`भाषिकांच्या' नव्हे!) प्रभावामुळे.
हिंदी आणि मराठीत बरेच शब्द सारखे आहेत, पण वेगवेगळ्या अर्थाचे.
त्यामुळे काही वेळा गफलत होते.
उदा.
खाली - रिकामी
व्यस्त - व्यग्र
आवाज देना - हाक मारणे (नंतर मला `आवाज' दे हेही ऐकायला मिळतं. तो त्याचा `आवाज' तुला कसा देणार? त्यासाठी स्वरयंत्रावर शस्त्रक्रिया करावी लागेल!)
यातायात (वाहतूक) (मराठीत `यातायात'चा अर्थ : व्याप, त्रास, हलवाहलव. त्या कामासाठी मला बरीच `यातायात' करावी लागली.)
असो.
एवढा उहापोह करण्याची गरज नाही.
गंमत म्हणून पाहावं, झालं.!
आपण कुठे भाषाशुद्धीचं व्रत घेतलंय?
-अभिजित.