माणूस पराधीन आहे म्हटले आहे ते ह्यासाठीच.

...जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून |
म्हणती हे वेडे पीर तरी 'आम्ही राजे' ||
....

असे आरती प्रभु म्हणाले, ते ह्यामुळेच असेल. सुखद घटनांपेक्षा दुःखद घटनाच माणसाच्या व्यक्तिमत्वाची प्रकर्षाने घडण करतात की काय असे वाटते. अश्या वेळी सुख दुःखाकडे स्थितप्रज्ञ वृत्तीने पाहण्यास सांगितल्याचे महत्त्वही जाणवते.