आढावा घेतला आहे. केवाकांशी सहमत. फक्त एक प्रश्न (तोही मागे कुठेतरी एका लेखात वाचलेला) आहे, त्याबद्दल आपण जर काही लिहू शकलात तर वाचायला आवडेल -- १९८२ मध्ये स्थापन झालेले तेलगू देसम अवघ्या नऊ महिन्यांत राज्यात सत्तेवर आले. १९८४ च्या लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांनी इंदिरा लाटेला थोपवून ८० टक्क्यांहून अधिक जागा मिळवल्या. तामिळनाडूतही द्रमुक-अद्रमुक या प्रादेशिक पक्षांनीच सत्ता गेली चाळीसेक वर्षे आपापसात वाटून घेतली आहे. मग महाराष्ट्रातच शिवसेनेला सत्तेवर यायला (तीही भाजपाची सोबत घेऊन) तीसहून अधिक वर्षे लागण्याचे कारण काय असावे? प्रादेशिक अस्मितेला मुंबईबाहेर फारसे नसणारे महत्त्व व/वा काँग्रेसने सहकार चळवळीतून रूजवलेले तृणमूल स्तरावरचे नेतृत्व/मतदारसंघ?