सेनेच्या कामगिरीचा/ वाटचालीचा आढावा चांगला घेतला आहे.
नंदन च्या प्रश्नाचे उत्तर एकच - 'मर्यादित महत्त्वाकांक्षा'!
या लेखाच्या अखेर काही प्रहसन करणे आवश्यक होते असे मला वाटते.
माझे बालपण दादरला म्हणजे सेनेच्या बालेकिल्ल्यात गेलेले आहे. ७२ ला झालेले आंदोलन (कर्नाटक प्रश्नामुळे कानड्यां विरुद्ध असलेले) मी अगदी जवळून पाहिलेले आहे. दादरचे विसावा लुटले गेले व दुध केंद्रे रस्त्यात आणून जाळली व अडथळे निर्माण केले गेले ते मी पाहिलेले आहे. सुधीर जोशी विशीत महापौर झालेले मी पाहिले आहेत. ८० टक्के कर्मचारीगण मराठी नसतील तर तुमचे दादर शाखा कशी सुरू होते असे स्टेट बँकेला खुलेआम आव्हान देणारा 'भटक्या' मी स्वतः पाहिलेला आहे. एकुण सेनेविषयी मला खुप आपुलकी असणे स्वाभाविक आहे. जेव्हा जेव्हा हिंदू मुसलमान दंगे पेटले तेव्हा तमाम मूंबैकर हिंदुंना सेनेचा आधार वाटला होता हे सत्य आहे. ८४ ला तर प्रभादेवीच्या सिद्धिविनायकावर मुसलमान हल्ला चढवणार/ माहिमच्या शितळदेवीवर हला चढवणार अशी अफवा उठताच शिवसैनिकांची प्रचंड साखळी तिथे संरक्षणासाठी उभी असलेली मुंबैकरांनी पाहिली आहे.
मात्र गेल्या काही वर्षात बेताल नेतृत्त्व, जुन्या निष्ठावंताना डावलणे, शाखाप्रमुखांची दादागिरी आणि संपूर्ण पालिका/ नगरसेवक सेनेचे असूनही झालेली उत्तर भारतियांची भरभराट या सर्वामुळे एकेकाळी सेनेचे काहितरी ऋण मानणारा वा आपुलकी राखून असणारा सुशिक्षित मधयमवर्ग आता सेनेपासून दूर जातो आहे हे विदारक सत्य या लेखात अखेरीस दाखवायला हवे होते असे मला वाटते.
साक्षी