उर्दूत पाच ज आणि त्याचे फक्त दोन उच्चार आहेत, मान्य. तर मग कोणता ज कधी लिहायचा, याचे काही ढोबळ नियम?
>>मराठीतल्या तत्सम शब्दांचे उच्चार मराठीप्रमाणे असावेत की संस्कृतप्रमाणे? <<
मराठीची प्रवृत्ती विचारात घेता, आणि-परंतु हे मराठी शब्द सोडून इतर ऱ्हस्वान्त शब्दांचे उच्चार, ते तसे लिहिले तरी, दीर्घान्त केले तरी चालावे. नाहीतरी जगातली कुठलीच भाषा लिहिल्याप्रमाणे उच्चारली जात नाही.
संस्कृतात व मराठीतल्या तत्सम शब्दात जोडाक्षराच्या अगोदरच्या अक्षरावर आघात होतो, मराठीतल्या तद्भव वा इतर शब्दात नाही..
त्यामुळे 'पुण्याला'तला पुण्य संस्कृत असेल तर-पुण्ण्याला, नाहीतर पुण्याला. तसे शाहिरी काव्याने(काव्व्याने), तर गनिमी काव्याने. तसेच वाह्यातांना(वाह्ह्यातांना) परंतु (संस्कृत 'विवाही'पासून झालेल्या मराठी)व्याह्यांना असे उच्चार व्हावेत..