उपजीविकेचा शोध सरतो ।
ज्या स्थळी, ते स्थान मुंबई ॥

स्वाभिमानी कामसूला ।
काम मिळते, ते स्थान मुंबई ॥

ईप्सितांचा शोध नेतो ।
ज्या स्थळी, ते स्थान मुंबई ॥

परतीचा रस्ता न रुचतो ।
ज्या स्थळी, ते स्थान मुंबई ॥

गणेश खूपच छान अर्थपूर्ण कविता. सुरेख.