महाभारतात ज्याच्या तोंडी संस्कृत संवाद आहेत तो कर्ण सूतपुत्र (सूत=सारथी) होता. म्हणजे आजच्या काळातील ड्रायव्हर / टांगेवाला समाज.

महाभारतातील पात्रे एकमेकांशी संस्कृतात संवाद साधत होती असे वाटत नाही. महाभारतकारांनी मात्र महाभारताची रचना करताना पात्रांच्या तोंडी संवाद टाकले. पीटर ब्रूक्सच्या महाभारतातील पात्रे एकमेकांशी इंग्रजीत बोलतात म्हणजे भीमाने द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी आपल्या थोरल्या भावाची निर्भर्त्सना फाडफाड इंग्रजीत केली असा अर्थ होत नाही. रामाबाबतही असेच घडणे शक्य आहे, या सर्वाचे श्रेय रचनाकारांना आहे. पात्रांना नाही. याचा अर्थ रामाला किंवा कर्णाला संस्कृत येत नसे असे नसून सदर व्यक्ती एकमेकांशी संस्कृतात संवाद साधत होत्या असे म्हटलेले मी आजपर्यंत कोठेही वाचलेले नाही. असल्यास संदर्भ आवडेल.

जनसामान्यांची भाषा प्राचीन काळी संस्कृत होती यावरही विश्वास ठेवणे कठीण आहे.

असो, ब्राह्मणेतरांना आज संस्कृत शिकायची संधी असल्याने संस्कृत ज्याला शिकाविशी वाटते त्यांनी अवश्य शिकावी. हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे.