जनसामान्यांची भाषा प्राचीन काळी संस्कृत होती यावरही विश्वास ठेवणे कठीण आहे.
म्हणूनच बुद्धाने आणि महावीराने आपले विचार जनसामान्यांपर्यंत पोचवायला जनसामान्यांच्या भाषाच निवडल्या. संस्कृत निवडली नाही. कारण संस्कृत ही कधीच जनसामान्यांची भाषा नव्हती. पण "महाभारतातील पात्रे एकमेकांशी संस्कृतात संवाद साधत होती असे वाटत नाही," हे प्रियालींचे मत बिलकुल पटण्यासारखे नाही. पात्रांनी कुठल्या भाषात बोलायचे हे शेवटी लेखकच ठरवणार ना? असो. महाभारत हा इतिहास आहे, असे मानले तरी मूळ त्या मूळ इतिहासाचा आवाका फार मोठा नसावा. काही इतिहासकारांच्या मते महाभारतात लेखकाने प्राचीन भारतातील टोळीयुद्धांना शब्दबद्ध केले आहे. ऋग्वेदा-पुराणांप्रमाणेच कालांतराने महाभारतील बराचसा मजकूर बदलण्यात आला, त्यात बराचसा मजकूर घुसडण्यात आला (इंग्रजीतले इंटरपोलेशन, एक्स्ट्रपोलेशन). नंतरच्या काळातील राजांनी आपली पौराणिकता (एँटिक्विटी) स्थापित करण्यासाठी, मागे नेण्यासाठी (इंग्रजीत टु प्रीडेट देअर एँटिक्विटी) आपले उल्लेख त्यात टाकले. (अमुक राजाचा वंश पांडवांकडून लढला, तमुक राजा कौरवांकडून लढला. वगैरे, वगैरे, वगैरे). अशा प्रकारे महाभारत फुगतफुगत 'महाभारत' झाले.
बाकी "संस्कृत ही पुरोहित वर्गाची भाषा आहे आणि हा गैरसमज ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर दोघांनीही मनापासून जपलाय," हा म्हणणे अगदी पटले. "उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे," हा असाच आणखी एक गैरसमज. त्यांनी दिलेली संस्कृतची वाक्येही सोपी आणि सहज समजण्यासारखीच आहेत. किंबहुना सोपी असल्यामुळेच समजण्यासारखी असावीत.
असो. एकंदर चर्चा चांगली चालली आहे.