पण "महाभारतातील पात्रे एकमेकांशी संस्कृतात संवाद साधत होती असे वाटत नाही," हे प्रियालींचे मत बिलकुल पटण्यासारखे नाही. पात्रांनी कुठल्या भाषात बोलायचे हे शेवटी लेखकच ठरवणार ना?
बरोबर! चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. महाभारत या महाकाव्यातील पात्रे एकमेकांशी संस्कृतातच बोलतात. जसे, एखादा लेखक अफ्रिका सफरीवर मराठीत पुस्तक लिहित असेल तर त्यात येणारे ओडुंबा ओलालेय हे पात्र स्वच्छ मराठीतच बोलेल. म्हणून ओडुंबा ओलालेय बघा कसे मराठीत फाड फाड बोलला आहे म्हणून त्याचे भांडवल करू नये.
आता हीच बाब राम, युधिष्ठीर, कर्ण या ऐतिहासिक व्यक्तींना लावली तर कर्ण आपल्या सूत-मातापित्यांशी संस्कृतात बोलत होता असे वाटत नाही पण याचा अर्थ तो परशुरामांशी संस्कृतात बोलत नव्हता असाही नसावा, पण म्हणून परशुराम आणि कर्णाने कधी विद्यार्जन सोडून यदाकदाचीत हवा पाण्याच्या गप्पा केल्या असतील तर त्या संस्कृतात केल्या असाव्यात असे वाटत नाही. (असे वाटत नाही हे माझे मत झाले...पण वाल्मिकी ऋषी हेच वाल्या कोळी हे ठाम सांगणारे पुरावे आहेत का?)
असो, अधिक पुराव्यांसाठी जे येथे वाचावे. (लेखातील मते लेखकाची आणि त्याने उद्धृत केलेल्या संपादकांची असून त्याबाबत अधिक विचारणा त्यांच्याकडेच करावी.)