काही इतिहासकारांच्या मते महाभारतात लेखकाने प्राचीन भारतातील टोळीयुद्धांना शब्दबद्ध केले आहे. ऋग्वेदा-पुराणांप्रमाणेच कालांतराने महाभारतील बराचसा मजकूर बदलण्यात आला, त्यात बराचसा मजकूर घुसडण्यात आला (इंग्रजीतले इंटरपोलेशन, एक्स्ट्रपोलेशन). नंतरच्या काळातील राजांनी आपली पौराणिकता (एँटिक्विटी) स्थापित करण्यासाठी, मागे नेण्यासाठी (इंग्रजीत टु प्रीडेट देअर एँटिक्विटी) आपले उल्लेख त्यात टाकले. (अमुक राजाचा वंश पांडवांकडून लढला, तमुक राजा कौरवांकडून लढला. वगैरे, वगैरे, वगैरे). अशा प्रकारे महाभारत फुगतफुगत 'महाभारत' झाले.
आताचे महाभारत हे फुगत फुगत सद्य फुग्यापर्यंत पोहोचले याबाबत इतिहासकारांत फारसे मतभेद नसावेत. (माझा फुगा मोठा का तुझा इतके मात्र असावेत.) तेव्हा येथे उल्लेखित वाक्यांवर माझा विश्वास बसतो. हा एक वेगळा विषय होऊ शकतो.
अवांतर: महाभारताला टोळीयुद्ध म्हटल्याने टाचणीने एकदम फुगा फट्ट फोडल्यासारखे वाटले. टोळीयुद्ध.... मस्त शब्द आहे. भयंकर आवडला. टोळीयुद्धात श्रीकृष्ण(जात: गवळी) याने "टाईमप्लीज" असे हाताला थुंकी लावत, "या चमन अर्जुनाला(जात: क्षत्रिय) जरा संस्कृतात शहाणपणा शिकवतो" म्हणत गीता सांगितली का काय कोणास ठाऊक!!
सर्वांनी ह. घ्या.