त्याचप्रमाणे रामायण महाभारतातील पात्रे संस्कृतात बोलत नसावीत असे लिहिणाऱ्यांनीही कारणे द्यावीत उदा. उपलब्ध पुराव्यांनुसार ती पात्रे अमुक अमुक भाषेत बोलत किंवा रामायण - महाभारताचा काळ इ. स. पू. इतके वर्षे त्यावेळी भारतात/ भागात संस्कृतच बोलले जात नव्हते वगैरे.
भारताव्यतिरिक्त रामायण आजही इंडोनेशियातील बालीमध्ये अत्यंत कौतुकाने वाचले जाते, साजरे केले जाते. त्यातील प्रसंगाचे तेथे रोजच शो (टूरिटांसाठी) केले जातात. ह्यावरून रामायण सगळेच्या सगळे भारतातच घडले असावे, ह्याबद्दलही नक्की काही सांगता येत नाही. मग भारतातील पुराणकालीन भाषा संस्कृत होती (हे तरी नक्की का?) असे मानून त्यावरून रामायणातील पात्रे संस्कृतातून एकमेकांशी बोलत असत, असे म्हणणे कितपत बरोबर आहे?
आणि एखादी घटना/ एखादा मुद्दा ठामपणे मांडतांना त्याबद्दल सय्युक्तिक पुरावे देण्याची जबाबदारी तसे मांडणाऱ्याची असते, 'ते तसेच का असेल', असे विचारण्याची नाही. (क्रिमिनल लॉनुसारही एखादा गुन्हा 'क्ष' व्यक्तिने केला आहे असे प्रतिपादन करतांना ते तसे बरोबर का आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी [ओनस] ते प्रतिपादन करणाऱ्यांची आहे. 'क्ष' नेच कशावरून, असे विचारणाऱ्यांवर 'तो गुन्हा 'क्ष' ने केलेला नाही', हे दाखवून देण्याची प्रार्थमिक जबाबदारी नसते).