माझ्या मते रामायण हे आर्ष महाकाव्य आहे. आर्ष याचा अर्थ वेदकालीन समाजाची बोलीभाषा. जिला नियमबद्ध आणि अभिजात (क्लासिकल) स्वरूप आले नव्हते अशी भाषा. या भाषेचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की शब्द जरी तेच असले तरी ती बोलीभाषा आहे. रामायण हे मुळातच बोलीभाषेत लिहिले गेले (इंग्रजीत डायलेक्ट! ) त्या अर्थी रामायणकालीन प्रचलित  भाषा ही संस्कृत असणार. त्यातून आजच्या काळात शिवकालीन मराठी ही बोलीभाषा असू शकेल किंवा अगदी शेक्स्पियरच्या नाटकांमधली दाय दाऊ ची भाषा एके काळी बोलीभाषा म्हणून प्रचारात असेल या गोष्टीची कल्पना करणे अवघड आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की आज आपल्य गतकाळाबद्दल ज्या काही कल्पना आहेत त्या सगळ्याच खऱ्याच असायला हव्यात.
जर संस्कृत ही एकेकाळी जनसामान्यांची संपर्कभाषा नसती तर बऱ्याचश्या भारतीय भाषांशी तिचं इतकं जवळचं नातं दिसलंच नसतं.(संस्कृतमधून प्राकृत की प्राकृतमधून संस्कृत हे मला सांगता येणार नाही पण या दोन्हींमध्ये अतिशय साधर्म्य आहे हे कोण कशातून उप्तन्न झालं हा वाद घालणाऱ्यांनाही नाकारता येणार नाही. शिवय भारतीय भाषा निर्माणा होऊन विकसित झाल्यावर त्यांच्यातले चुळका चुळका गुणधर्म एकत्र करून काही कोणी संस्कृत भाषेची निर्मिती केलेली नाही हेही सत्य आहे)
सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तथाकथित ब्राह्मणेतर किंवा ब्रह्मद्वेष्ट्यांच्या दृष्टीने जरी मान्य करायला अतिशय कठीण असली तरी हे गोष्ट सत्य आहे रामायण - महाभारतकालीन लोकं आज आपण इंग्रजी फाडफाड बोलत नाही इत्तक्या लीलया संस्कृतमधून दररोज संभषण करीत होती. (स्त्रिया आणि ब्राह्मण-क्षत्रियेतर लोकांच्या तोंडी प्राकृत भाषा असणारी नाटके महाभारतोत्तरकालीन आहेत.) नाहीतर " खांद्यावरच्या मेण्याच्या भारापेक्षा मेण्यातील व्यक्तीने वापरलेला चुकीचा प्रत्यय अधिक टोचतो आहे" असे म्हणणारा भारवाहक सापडला नसता.
संस्कृतबद्दल बाऊ न करता किंवा अवाजवी अभिमान न बाळगता ती एक भारतीय भाषा आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने आजही ती दैनंदिन व्यवहारात वापरता येऊ शकते ही गोष्ट आपल्या देशात कधी मान्य होईल तो सुदिन. भारतात येऊन आस्थेने संस्कृतचा अभ्यास करणारे अभारतीय लोक आवर्जून संस्कृतमध्ये संवाद साधतात आणि भारतीय मात्र दोनशे वर्षांपूर्वी पाश्चात्य विद्वानांनी निःसंशय द्वेषमूलक दृष्टीने काढलेल्या उद्गारांनाच ब्रह्मवाक्य म्हणून उराशे कवटाळून बसतात.
इंटरनेट महाविद्यालयात जगातलं सर्व ज्ञान मिळतंच असं नाही. त्यासाठी ग्रंथगुरूंना शरण जावंच लागतं आणि अभ्यास हा तर कायमच महत्त्वाचा होता आहे आणि राहणार आहे याबाबत मात्र कोणाचं दुमत असणार नाही (अगदी माननीय टगेरावांचं सुद्धा!!!!) अशी आशा आहे.

--अदिती