प्रतिसाद बोली भाषेतच लिहिले गेले आहेत व व्याकरणदृष्ट्या बरोबर आहेत. हे जर मानले तर कृष्ण अर्जुनाशी संस्कृतमध्ये बोलला हे मान्य करावे लागेल.
परंतु याला छेद देणारे विधान करता येईल की लेखक वेगळ्या भाषेत लिहितो. मग प्रियालीताई म्हणतात त्याप्रमाणे ब्रुक्सची पात्रे इंग्रजी बोलत होती. म्हणजे एकच निकष वापरणे बरोबर नाही. मृदुलाताई संस्कृतज्ञ आहेत. पण त्या भाषातज्ञ तसेच इतिहासकार आहेत की नाही ठाऊक नाही वा त्यांची मते त्यांनी घेतली की नाही हे त्या स्पष्ट करीत नाहीत. जर तसे नसेल तर त्यांची विधाने स्वीकारता येत नाहीत.
दुसरी गोष्ट.महाभारतातीलच दाखला देतो. एकलव्याला शिकविण्यास द्रोणाचर्यांनी नकार दिला. कारण तो क्षत्रिय वा राजवंशातील नव्हता. त्याचप्रमाणे परशुरामांनी कर्णाला पण याच कारणासाठी शाप दिला. तसे जर असेल तर ब्राम्हणेतरांना संस्कृत शिकण्याचा अधिकार नव्हता.
आधुनिक काळात जातिव्यवस्थेचे स्तोम नष्ट झाले असल्यामुळे व कायद्याच्या समानतेमुळे किणीही संस्कृत शिकतो. पण अल्लाउद्दीन खलजीच्या (मराठीमध्ये खिलजी) आक्रमणानंतर जवळजवळ १००० वर्षे संस्कृतचा विकास खुंटला. आधुनिक तांत्रिक तसेच कायदेशीर शब्द संस्कृतमध्ये नाहीत. मग ही १००० वर्षांची दरी कशी भरून काढणार?
केवळ हौस एवढेच याचे उत्तर असावे.