का, कुणासाठी अशी ही आर्त गाणी?
गात असते सावळ्या डोहात पाणी
वावा!!

सांज आता पूर्ण अंधारात गेली
एकट्याने चालण्याची वेळ झाली
भय न उरले ना कुणाचा धाक आता
फक्त अंधारात दिसते वाट आता
वा वा. सुरेख. ज्ञान, दिशा आणि मार्ग ह्या सगळ्यांची प्राप्ती ज्या क्षणी होते तो आनंद काय वर्णावा.

असेच. महेश, तुम्ही वर्णिलेला हा 'आनंद' अस्मादिकांच्या डोस्क्यात डोकावला नव्हता. धन्यवाद.


बाकी पावलांचे जागणे कळले नाही. तिथे महेश ह्यांनी सुचविलेला बदल ओढाताण टाळणारा आहे. दुसरा अन् भरीचा वाटतो आहे.