फक्त एक छळणारा विचार चमकून जातो. पन्नास वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रात असणाऱ्या आणि तरीही मराठी न येणाऱ्या आर के लक्ष्मण, राहुल बजाज, या आणि तत्सम मंडळींना हा लेख कुणी भाषांतर करून देईल का? (संदर्भासाठीः "माझा नोकर किंवा माझी बायको बाजारहाट करते, त्यामुळे बाजारात जाऊन मराठी बोलण्याची वेळ माझ्यावर कधी येत नाही" इति आर के लक्ष्मण; "माझी बायको मराठी असूनही मी मराठी शिकलो नाही याचा कधीकधी पश्चात्ताप होतो" इति राहुल बजाज)

महाराष्ट्राखेरीज दुसऱ्या कुठल्याही राज्यात पन्नास वर्षे राहून, तिथे पैका कमावून, तिथली भाषा न येणारे किती नरपुंगव असतील? महाराष्ट्रातच काय खतपाणी मिळते म्हणून त्यांचे पीक येते?

आणि भाषांतर करायला घेतलेच, तर कश्मिरमध्येच बाकी देशाहून वेगळे धोरण राबवणाऱ्या केंद्र सरकारलाही भाषांतर करून द्यायला कुणी मिळेल का? सप्तर्षी पाहून कश्मीर आणि युक्तप्रांत आठवणाऱ्या विनोबाजींनी दुर्दैवाने ते केलेले दिसत नाही. की त्यांनी केले, पण "अनुशासन पर्व" पाळणाऱ्या केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले?

"प्रांताच्या सीमेवरचे भाग तर संगमाप्रमाणे तीर्थक्षेत्रे माना. ते इकडे का तिकडे भांडू नका." हे आजच्या बेळगांवात जाऊन (मराठीत) बोलण्याची कुणाची हिंमत असेल तर त्याचा/तिचा आयुर्विम्याचा हप्ता भरण्यासाठी आपण तयार आहोत!