रामायण-महाभारताचे माहीत नाही.  पण ज्याअर्थी शंकराचार्यांनी केरळ ते काश्मीर आणि द्वारका ते  जगन्नाथपुरी असा प्रवास करून भारतभर वैदिक धर्माचा प्रचार केला, अनेक विद्वानांशी वाद केले, अनेक ग्रंथ संपादन केले आणि त्या प्रवासात त्यांना  भाषेची कसलीही अडचण आली नाही, त्याअर्थी भारतभर संस्कृत समजणारी सामान्य माणसे असली पाहिजेत.