भाषावार प्रांतरचना का झाली माहीत आहे? ब्रिटिशांचे सर्वच भारतीय भाषांबद्दल समान धोरण होते. पण काँग्रेसचे राज्य आल्यावर त्यांनी नेमलेले मुख्यमंत्री इतर भाषकांना सापत्न वागणूक देऊ लागले. राजकीय पुढाऱ्यांनी सर्व भाषांमधील समाईक दुवा असलेल्या इंग्रजी भाषेचा द्वेष करायला सुरुवात केली. शालीय शिक्षणातला इंग्रजी-संस्कृतचा आणि त्यामुळे इतर सर्व भाषांच्या शिक्षणाचा दर्जा बहुजनांच्या(?) सोयीसाठी कमी केला. उत्तरेकडील आणि महाराष्ट्रातील समाजवादी आणि काही राजकीय पक्ष इंग्रजीच्या मुळावर उठले. आणि त्यामुळे भाषाद्वेष वाढीला लागला. त्यातून भाषावार प्रांतरचना जन्माला आली.
हिंदी ही अप्रगल्भ भाषा असल्याने ती त्याकाळी भाषकां-भाषकांमधला दुवा होऊ शकली नाही. आजही झालेली नाही. केवळ चित्रपटांची भाषा म्हणूनच हिंदी अधिकाधिक लोकांना समजू लागली. लोकमान्य टिळकांना उर्दू येत नव्हते. त्यामुळे ते परप्रांतात इंग्रजीतून बोलत. आजही विदर्भातील सोडले तर, एकाही मराठी नेत्याला हिंदीत चांगले बोलता येत नाही, इंग्रजीत तर अजिबात नाही. अनेकांचे मराठी लिखाणपण दिव्य असते.
इंग्रजी-संस्कृतचा किंवा हिंदीचा द्वेष न करता मातृभाषेवर प्रेम केले असते तर, चित्र वेगळे दिसले असते. आणि भाषावार प्रांतरचनेची गरजच पडली नसती.