नेम्क्या कुठल्या काऱणाने राजने हिंसाचार पेटवला ते या लेखात कुठेही नाही! राज्ने ही जी तथाकथित मराठी रक्षणाची भुमिका घेतली आहे ती केवळ शिवसेनेला शह म्हणुन.
१. राज/मनसे यानी किती भ्र्ष्ट अधिकर्यांविरुध कारवाईची मागणी केली/ आंदोलन केले?
२. पानटपरीवाले/ टैक्सीवाले यांना मार्हाण करून मराठी माणूस कसा पुढे येणार आहे?
३. आज माझं आंदोलन हे उत्तर भारतीयांच्या महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक आणि राजकीय दादागिरी आणि गुंडगिरीविरुद्ध आहे . त्यांच्याकडे उत्तरेतून येणारे गुंड नेते , त्यांच्यामार्फत येणारे प्रचंड प्रमाणातले चलन , शस्त्रास्त्रं आहेत . इथे त्यांचं मग्रुर मनुष्यबळ वाढवण्याच्या प्रयत्नात ते असतात . भय्या टॅक्सीवाला , रिक्षावाला , मच्छीमार हा गरीब बिचारा उत्तरेतून आलेला असं चित्र भय्यांची लॉबी असलेली चॅनल्स उभी करतात . परंतु त्यांना रोजच्या जगण्यात एकेकटा स्थानिक मराठी माणूस भेटतो , त्यांच्याशी व्यवहार करतो , तेव्हा त्यांची खास उत्तरेतली मगुरी , महाराष्ट्राबद्दलचा त्यांचा द्वेष , उत्तरेतल्या गुंडांवरची त्यांची श्रद्धा या साऱ्याचं आपल्याला दर्शन होतं . त्यामुळे ' तो गरीब बिचारा पोटासाठी येतो ' अशा वाक्यात यांचं वर्णन होऊच शकत नाही
राजचे हे आंदोलन "गुंडदिरीविरुध" आहे असे म्हणणे म्हणजे सुंदर राजकाऱणाचा नमुना आहे!
जेव्हा हे गुंड मुबईत आले तेंव्हा ज्या मराठी लोकांनी त्यांना सहारा दिला त्यांच्या विरोधात राज ठाक्रे काही बोलल्याचे आठबत नाही!
तसेच आत्ताही राजने केवळ टैक्सीवाल्यांविरुध आंदोलन उभे केले आहे! "माझी भुमिका-माझा लढा" वाचून जे चित्र मनात उभे राहते त्याच्याशी राजचे वागणे  कुठेही जुळतनाही. आणि  राज्ने "भुमिपुत्रांसाठी" काय केले आहे तेही कुठेही समजत नाही. एकुण एक छान चटक्दार भाषण या पलीकडे या लेखाची पत्रास खुद्द राज्नेच ठेवलेली नाही!