सर्व प्रतिसादावरून असे वाटते की श्री. राज ठाकरे यांना जरी परप्रांतियांनी आणि त्यांच्याच तालावर नाचणाऱ्या राज्यकर्त्यानी शिव्या दिल्या तरी त्यांचा मुद्दा बरोबरच आहे हे निश्चित ! मराठी माणूस मात्र आपली सहिष्णुता सोडायला तयार नाही त्यामुळे मुंबईत गेला तर तो लगेच टॅक्सीवाल्याशी हिंदीतच बोलायला सुरवात करणार. पुण्यात सुद्धा भय्याच्या दुग्धालयात तो भय्याची गैरसोय होऊ नये म्हणून त्याला हिंदीतच दो लिटर भैंसका दूध देना अस म्हणणार मग आश्चर्य काय त्या भय्यालाही आपण यूपीतच आहोत असे वाटते यात ?