आंध्रमधील पोट्टी श्रीरामलू यांनी स्वतंत्र आंध्रप्रदेशाकरता आमरण उपोषण केले. भाषावार प्रांतरचनेस तो पर्यंत नेहरूंचा आणि काँग्रेसचा विरोध होता. तत्वासाठी की सत्ताकेंद्रकरणासाठी ते माहीत नाही. त्या उपोषणात श्रीरामलूंचे निधन झाले आणि नंतर जनमताया क्षोभाला बळी पडून आंध्रप्रदेश हे पहीले भाषिक राज्य तयार झाले. मग केरळ, कर्नाटक आणि नंतर गुजरात महाराष्ट्र तयार झाले.
महाराष्ट्र हा नेहेमीच देशाला अधिक महत्त्व देणारा कसा याचे अजून एक उदाहरणः संयुक्त महाराष्ट्र समिती (अत्रे, डांगे, गोरे, शंकरराव देव वगैरे) सावरकरांना पाठींबा मागायला गेले. साधारण १९६०च्या जवळ. ते म्हणाले की राज्यांच्या सीमा नंतर पहा, त्या नेहरूंना सांगा की त्या "च्याओ माओ" कडे लक्ष देऊन देशाया सीमा सांभाळा...