का जैन जीर्णोद्धार करत नाहीत? करतात, अगदी कोट्यवधी रुपये खर्चून.  मराठी माणूस शहरात नोकरी करून  निवृत्तीनंतर गावी जाऊन पंधरावीस हजार रुपये वर्गणी देऊन, पडझडीला आलेल्या आपल्या खेड्यातील देवळाच्या डागडुजीला मदत करतो.  तो रुग्णालये काढत नाही, पण १६-१७ वर्षे अभ्यास करून मिळवलेल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून रुग्णालयात कमी पगारावर नोकरी करतो. मराठी माणसाची व जैन माणसाची तुलना करणे रास्त नाही. यात जैन लोकांना कमी लेखण्याचा अजिबात उद्देश नाही.  ते जे करतात ते स्पृहणीयच आहे.