,,जुन्या काळी संस्कृतची स्थिती, एकच शब्द समजण्याइतकी वाईट नसावी. माणसाच्या गरजा अत्यंत कमी होत्या. त्यामुळे रोजच्या वापरातल्या शब्दांच्या गरजा भागवण्यापुरते संस्कृत लोकांना समजत असावे. कुणी संस्कृतमध्ये पृच्छा केली की त्याचा अर्थ समजून खाणाखुणांना का होईना, प्रतिसाद देता येत असावा.  आणि हे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, आणि द्वारका ते जगन्नाथपुरीपर्यंत. कदाचित अफगाणिस्तानापर्यंतसुद्धा. काही झाले तरी भारतीय भाषांतले अनेक शब्द संस्कृत किवा संस्कृतोद्भव आहेत.