मंडळी
प्रतीसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.
केशवसुमार - आपण "मुक्त व्यासपीठ" असा उत्कृष्ट उल्लेख केला आहे.
व्यासपीठ म्हटले म्हणजे आचार संहीता ही अंगभूत आलीच . "मुक्त" म्हटल्याने मुलभूत आचारसंहीता लगेच धाब्यावर बसवून चालणार आहे काय ?
शेवटी इतरांच्या प्रतीभेचा आदर राखावा की नाही हे सांगण्यास आचारसंहीतेचा आधार घ्यावा लागणे हे मुळ काव्यकारांचे आणि रसिकांचे दुर्दैव म्हणावे की काय ?
विडंबन काव्यास विरोध नसून ,मुळ काव्य प्रकाशनाची वेळ आणि विडंबन कवीतेच्या प्रकाशनाच्या वेळेत काही अंतर असावे काय यावर तात्त्विक चर्चा व्हावी एवढीच माफक अपेक्षा.
विनम्र