घरच्यांची पण मने राखली जातील अशी एक गोष्ट करू शकता. ज्योतिष्याला विचारून यावर एखादा तोडगा आहे का पाहा. उदाहरणार्थ, मंत्र जप वगैरे. जप केल्याने नुकसान तर होणार नाही. झालेच तर मन: शांती लाभेल. ज्यांचा विश्वास आहे त्यांच्याही मनास बरे वाटेल. ज्यांचा विश्वास नाही त्यांचा तर प्रश्न नाही. ज्योतिषशास्त्र खोटे की खरे या वादात जाण्यापेक्षा, यावर तोडगा शोधा, किंवा ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ असल्याने, मुलीच्या लग्नानंतरच्या संभाव्य वागणूकीची कल्पना मुलाला आधीच देवून त्याप्रमाणे त्याला तडजोड करण्यास सांगावे....

मुला मुलीचा ज्योतिषशास्त्रावर भले विश्वास नसेल, पण त्या दोघांचा इतर दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर (ज्याला इतर अंधश्रद्धा म्हणतील) विश्वास असेलच... तेव्हा अंधश्रद्धा ही व्यक्तीसापेक्ष/कालसापेक्ष/प्रदेशसापेक्ष असते.

एके ठीकाणी मांजर/घुबड अशुभ तर दुसरे ठीकाणी ते शुभ असते. वगैरे वगैरे...

हे माझे मत आहे. मी सुचवून बघितले... करून बघू शकता.