लेखकालाही हे विडंबन म्हणूनच करायचे होते असे दिसते.
ह्या विडंबनातली मजा मूळ गाण्यात, कमीत कमी शब्द फिरवून, भावनेच्या केलेल्या विपर्यासामधून निर्माण होत आहे.
रचना व्यवस्थित आहे.
ही मजा विनोदात्मक आहे की कारुण्यमय की कुणाची फजिती झाल्यावर येते तसली अवांछनीय हे सांगणे अवघड आहे.
मात्र ती निखळ आनंददायक नाही. हा रचनेचा दोष आहे. अवांछनीय भाव रचनेतून स्त्रवू नयेत.
शोकपर्यवसायी आहे. ह्या अर्थाने करूण्यमय वाटली असावी.