जीव मुठीत वगैरे धरून रस्ता ओलांडतात ते रस्ता चुकीच्या ठिकाणी (म्हणजे सिग्नल सोडून इतरत्र) आणि चुकीच्या मार्गाने (म्हणजे गाडी वेगात येतेय हे दिसतानाही आपण धावत सहज दुसऱ्या बाजुला जाउ असे सम्जून) ओलांडतात.  आजही पुण्या-मुंबईत भरपुर सिग्नल्स आहेत.  नियम पाळणाऱ्याना त्रास न होता आणि कमी वेळेत रस्ता ओलांडता येतो. 

गाडीचालकांना दोष देताना एकदा मुंबैच्या रस्त्यावर गाडी चालवून पाहा म्हणजे कुठेही कसाही रस्ता ओलांडणारे स्वतः आणि गाडीवाला दोघांच्याही जीवाला कसा धोका निर्माण करतात ते कळेल. आणि दुर्दैवाने काही झालेच तर मार मात्र गाडीवालाच खातो.  मग भले त्याचा दोष असो वा नसो.