राज ठाकरे काहीही चुकीचे बोलला असे वाटत नाही. जे काही झाले तो TRP साठी केलेला भाषणांचा विपर्यास होता. आणि तो जाणून बुजून मुद्दाम केलेला होता. ह्यात दोषाचा सर्वात मोठा धनी मराठी माणूसच आहे. ज्याला आपल्या भाषेबद्दल आपण "इतरांसारखाच" अभिमान बाळगावा असे कोणीतरी सांगवे लागते.
मुंबईत भैय्ये हे अतिशय सुनियोजितप्रकारे वसवले गेलेत. त्याला मराठी माणसाच्या शिवसेने उदार हस्ते (पैसे खाऊन) मदत केली. गेली १५-२० वर्ष मनपात "युती" आहे. शिवसेनेच्या मराठी मतांबरोबरच भाजपची हिंदू मत म्हणून भैय्ये मुंबईत वसवले गेलेत. त्याला आमिष म्हणून मोफत घरांची योजना पसरवली गेली. SRA मध्ये बहुतेक मंडळी ह्याच "युती" चा भाग. त्यातून ह्या लोकांनी भरपूर पैसा कमाविला. प्रचंड भ्रष्टाचार झाला आणी आजही चालू आहे. म्हणूनच मनसेचे आंदोलन चालू होताच काही ठिकाणी शिवसैनिक भैय्यांच्या वस्तीला "protection" पुरवत होते.
गेल्या अनेक वर्षात साधे फेरीवाले हटवण्याचे कामही ह्यांना करता आले नाही, मुळात ते हटावेत अशी इच्छा कोणाचीच नाही. अनधिकृत बांधकामे, फेरीवाले हटवण्याचे काम करणाऱ्या खैरनार, रोकडे ह्यांना मात्र हटवलं गेलं. आमची मुंबई म्हणणारा मराठी माणूस त्याच्याच मुंबईत त्याच्या घरच्या रस्त्यावर असणाऱ्या, ज्यांच्यामुळे त्यालाच त्रास होतो अश्या फेरीवाल्यांची साधी तक्रारही करायला घाबरतो. मुळात आपण भित्रे आहोत म्हणून आपल्याला कधी बाळ ठाकरे तर कधी राज ठाकरे लागतो. मुंबईतून फक्त अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांना, कायदे मोडणाऱ्यांना बाहेर काढलं तरी ९०% टक्के भैय्ये कमी होतील. पण ते काढणार कोण, मंत्रालयापासून मनपापर्यंत ठिकठिकाणी पैसा खात बसलेला मराठी माणूस ?? की जो तक्रारही करत नाही असा भित्रा मराठी माणूस ? बाळ ठाकरेकडून धोर निराशा पदरी पडली. मागील निवडणूकीत मतदारंचे पाय धरलेत म्हणून हे मनपात सत्तेत आलेत. ह्यावेळी आता मराठी मत फुटलेली असतील. ह्याचा पूर्णं फायदा इतरांना होणार हे स्वाभाविकच आहे.
सत्तेत, प्रशासनात राहून जिथे मराठी माणूस मुंबईत मराठी टिकवू शकला नाही, तिथे सत्ता गेल्यावर बोंबच असणार आहे ! मुळात आताच जर काही ठोस उपाय केले गेले नाहीत, मत फुटली नाहीत, तरच उरली सुरली मराठी मुंबईत टिकेल. अन्यथा आपल्या नाकारतेपणामुळे ती ही उरणार नाही.
मयुरेश वैद्य.