कोणे एके काळी जेंव्हा ग्रहांचे स्वरूप माहीत नव्हते त्या काळात ग्रहांची भीती माणसाला वाटत असेल. अज्ञात गोष्टींची भीती वाटणे हा मनुष्यस्वभाव आहे. आज आपल्याला प्रत्येक ग्रहाबद्दल भरपूर माहिती उपलब्ध आहे.
१. त्या निर्जीव वस्तू आहेत. निर्जीव वस्तूला कधी राग, द्वेश, आनंद, दुःख अशा भावना नसतात. त्यामुळे कोणत्याही ग्रहाची भीती बाळगण्याचे कारण नाही.
२. प्रत्येक ग्रहगोल आपापल्या कक्षेतून अत्यंत काटेकोर गतीने फिरत असतो. आपली कक्षा सोडून तो कोठेही जाऊ शकत नाही. आपल्याला उपद्रव देण्यासाठी तो तसूभरही इकडे तिकडे जाऊ शकत नाही.
३. मेश, वृषभ वगैरे राशी (घरे) ज्या तारकांनी बनले आहेत ते तारे सूर्यमालिकेपासून शेकडो प्रकाशवर्षे दूर आहेत त्या मानाने सारे ग्रह आपल्या पृथ्वीच्या जवळ असतात. त्या दोघांचा एकमेकाशी कसलाही संबंध नसतो.