मराठीला मान दिला जाईल ह्याबातीत थोडा साशंक आहे मी. राजकीय मुद्याकरीता का होईना पण मराठीवर जोर दिला जातोय हेच माझेही समाधान.

मागे स्टार माझा वर राज ठाकरेंचे भाषण ऐकले त्यात ते म्हणत होते की एक राष्ट्रपती भाषणात हिंदी वापरत नव्हते. राष्ट्रभाषा भाषणात वापरली नाही म्हणून त्यांनी खरडपट्टी काढली. पण जेव्हा पी. सी. अलेक्झांडर आपले राज्यपाल होते, ते तर महाराष्ट्रदिनाच्या, इतर समारंभाच्या भाषणात मराठी वापरत नव्हते. तेव्हा राज ठाकरे व शिवसेना ह्यांचे मराठी प्रेम कुठे गेले होते? राज ठाकरे तेव्हा शिवसेनेतच होते.

बाकी, शिवसेनेनेही हा मुद्दा आता उचलून धरला आहे कारण त्यांनाही ह्याचा फायदा करून घ्यायचा आहे असे वाटते.
स्मिता ठाकरे ह्या सिनेमा बनवितात ते सिनेमा हिंदीमध्ये असतात. तेव्हा कुठे जाते त्यांचे मराठीप्रेम?
मराठी सिनेमाला जेव्हा प्रेक्षक नव्हते, तेव्हा ह्यांनी प्रयत्न केला का मराठीत सिनेमा काढण्याचा? आता भरपूर मराठी चित्रपट येत आहेत, पैसा ही मिळत असेल तेव्हा लक्ष जाईल सर्वांचे मराठी सिनेमाकडे. मराठीवरी प्रेम उतू जाईल.

असो, पाहूया पुढे काय काय होते ते.