'ज्या' गोष्टींबाबत आपण प्रयोग, निरिक्षण, अनुमान काढतो, त्या गोष्टी आधीपासुनच पृथ्वीवर होत्या. त्या कोठून आल्या याचे उत्तर विज्ञान देवू शकत नाही. त्या आधीपासूनच पृथ्वीच्या पोटात / पृथ्वीवर होत्या असे मानले, तर पृथ्वी कोठून आली? सुर्यापासून! तर मग सूर्य कोठून आला? की कुणी बनवला? ज्याने सूर्य निर्माण केला त्याला कोणी निर्माण केले? याचे अचूक, ठोस उत्तर विज्ञान देवू शकत नाही. सृष्टीचे प्रायोजन काय? पुर्वी अवकाशात काहीच नव्हते तेव्हा काय होते? काहीच नव्हते तर मग पहीली निर्जीव / सजीव वस्तू कोणती आली?  व कशी? कोठून ?

प्रयोग, निरिक्षण, अनुमान काढणारा मनुष्यच आहे. आहे त्याचाच फक्त मनुष्य निष्कर्ष काढतो. पण हा निष्कर्ष काढणारा मनुष्य ( पहीला सजीव ) कोठून आला? त्याचे प्रायोजन काय ? विज्ञान सांगू शकत नाही. प्रयोग, निरिक्षण, अनुमान काढून ते नोंद करून ठेवणे एवढेच आपण करतो. ते तर आधीपासूनच आहे. आपण फक्त त्याला नियमात बांधले. वीज अणूरेणूंपासून बनते (इलेक्ट्रॉन) ठीक आहे. पण अणू रेणू चे अस्तित्व का आहे? ते सांगू शकत नाही विज्ञान!

आपल्या शरिरात असलेल्या सगळ्या अवयवांची फक्त माहीती वैद्यकशास्त्राने मिळविली व रोगांवर उपाय शोधले. पण शरीराची रचना वैद्यकशास्त्राने नाही केली! ती कोणी केली? सगळे अवयव अगदी ईमानेईतबारे अखंड चालू असतात, रक्तवाहीन्यांनी जोडलेले असतात, ते कसे? ते काय विज्ञानाने जोडले नाहीत! नऊ महिने पोटात बाळ वाढतं, हा चमत्कार नाही?

एखादी गोष्ट कशी, का घडली हे विज्ञान सांगू शकते. पण ती गोष्ट अस्तित्वात का आहे हे काही बाबतीत विज्ञान सांगू शकत नाही. ( ईलेक्ट्रॉन का आहेत पृथ्वीवर ? )

तात्पर्य : जो शोध लावतो त्याच्याच अस्तित्वाचे प्रायोजन माहीती नाही.

         ज्याचा शोध लावला जातो (प्रयोग, निरिक्षण, अनुमान काढून!) त्या वस्तूंचे अस्तित्वाचे प्रायोजन माहीती नाही.

मग अशी एक शक्ती जरूर आहे, जीने आपल्याला व त्या वस्तूंना बनवले! काय वाटते आपल्याला?